Skip to main content
logo
logo

आमच्याबद्दल

महानगरपालिकेची माहिती 


पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह दि. 12 जून 1985 रोजी मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली त्यानंतर 23 जानेवारी 1990 रोजी राईमुर्धे, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतीचा समावेश झाला. या नगरपालिकेच्या सभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, वसईची खाडी, उत्तन, गोराई बिच असा एकुण 79.40 चौ. कि.मी. एवढ्या क्षेत्रफळात निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर. लोकसंख्या वाढीनुसार दि. 28 फेब्रुवारी 2002 रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले, मिटा भाईंदर शहराची सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 8,09,378 एवढी असुन दिवसेंदिवस जसजसा शहराचा विकास होत आहे त्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. ज्याप्रमाणात शहराचा विकास होत आहे त्याचे दुप्पट प्रमाणात शहराची लोकसंख्या जवळजवळ वाढत असल्याने महानगरपालिकेजवळ उपलब्ध असलेल्या नागरी सेवा सुविधांवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे काही वेळा नागरी सुविधा पुरविणे प्रशासनास अडचणीचे होत असले तरी महानगरपालिका नागरीकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
     महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री. शिवमुर्ती नाईक यांनी कामकाज पाहिले असुन सद्यस्थितीत , श्री  संजय श्रीपतराव काटकर, (भा.प्र.से.) हे आयुक्त आहेत.

स्थापना :- दिनांक 12 जून 1985
क्षेत्रफळ :- 79.40 चौ. कि.मी
स्विकृत सदस्य :- 95 + 5 
मनपा दवाखाने / आरोग्य केंद्रे :- 02/09
मनपा अग्निशमन केंद्र :- 03
एकूण बस मार्ग :– 13
महापालिका परिवहन बस संख्या :- 47